धानू शिरपती,
कुठं कशाची झाली रं पर्गती?
गाडी बी तीच
गडी बी तेच
बैल बी तेच
कासरा त्योच सैल
मग बदललं ते काय?
बैलाचं पाय?
उजव्या अंगाचा भादा बैल,
डाव्या अंगाला आला
पर,
त्यानं बदल रं काय झाला?
आता बसणाराना वाटतंय
जत्रा माघारी निघाली
माझ म्हननं
ही मजलच अवघड हाय
हे वझं जीवापरीस जड हाय
गाडी बी नवी बांधाय हुवी
रस्ता बी नवा कराय होवा
ताजीतवानी खोंडं जुपली
'त' कुणाला ठावं
जाईल गाडी सरळ
पण हे कुणी करायचं?
कसं करायचं?
पयला गाडीवान म्हनायचा
जल्दी जल्दी
आताचा बी म्हनतोय
जल्दी जल्दी
वाट बदलत न्हाई
बैल हालत नाही
धानू शिरपती,
ही कसली गा क्रांती?
-ग.दि.मा.
(‘पूरिया’ या ग.दि.मां च्या काव्यसंग्रहातील ही कविता आहे. प्रस्तावनेत शांता शेळके लिहितात:
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कॄषिकांचे, दलितांचे, सा-या हीनदीन जनतेचे भाग्य उजळून टाकण्याच्या हेतूने शासन कटिबध्द झाले. नवनव्या योजना आखल्या गेल्या. उध्दाराचे नारे उठले. पण प्रत्यक्ष हातामधे काय आले? ‘पूरिया’ मधील ‘कृषिकांचे पालुपद’, ‘पर्गती’, ‘भूमिहीन’ या कविता लक्षणीय आहेत. उपरोधपूर्ण आणि तळमळीच्या भाषेत कवी ‘धानू शिरपती’ या कृषिकाशी त्याच्याच ग्रामीण बोलीभाषेत संवाद करत आहे. हा संवाद माडगूळकरांच्या उत्कट जाणिवेचा जसा निदर्शक आहे, तसा त्यांच्या नाटयात्म चित्रदर्शी शैलीचाही सुंदर नमुना आहे. ‘पर्गती’ या कवितेत सर्व शासनावरच बैलगाडीचे रुपक कवीने केले आहे.)
Tuesday, November 30, 2010
गीतांजलीतील चौथ्या कवितेचे (शीर्षकः प्रार्थना) मराठी भाषांतर
विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर
ही माझी प्रार्थना नाही;
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये
एवढीच माझी इच्छा|
दु:खतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे
तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही.
दु:खावर जय मिळवता यावा
एवढीच माझी इच्छा|
जगात माझे नुकसान झाले
केवळ फसवणूक वाट्याला आली;
तर माझे मन खंबीर व्हावे
एवढीच माझी इच्छा|
माझे तारण तू करावेस वा मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही.
तरुन जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे
एवढीच माझी इच्छा|
माझे ओझे हलके करुन
तू माझे स्वांत्वन केले नाहीस तरी माझी तक्रार नाही
ते ओझे वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी
एवढीच माझी इच्छा|
सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन
मी तुझा चेहरा ओळखावा
दु:खांच्या रात्री जेव्हा, सारे जग फसवणूक करील,
तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका मात्र निर्माण होऊ नये, एवढीच माझी इच्छा|
रवीन्द्र्नाथ टागोर
ही माझी प्रार्थना नाही;
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये
एवढीच माझी इच्छा|
दु:खतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे
तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही.
दु:खावर जय मिळवता यावा
एवढीच माझी इच्छा|
जगात माझे नुकसान झाले
केवळ फसवणूक वाट्याला आली;
तर माझे मन खंबीर व्हावे
एवढीच माझी इच्छा|
माझे तारण तू करावेस वा मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही.
तरुन जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे
एवढीच माझी इच्छा|
माझे ओझे हलके करुन
तू माझे स्वांत्वन केले नाहीस तरी माझी तक्रार नाही
ते ओझे वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी
एवढीच माझी इच्छा|
सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन
मी तुझा चेहरा ओळखावा
दु:खांच्या रात्री जेव्हा, सारे जग फसवणूक करील,
तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका मात्र निर्माण होऊ नये, एवढीच माझी इच्छा|
रवीन्द्र्नाथ टागोर
Subscribe to:
Posts (Atom)