धन्यवाद, मिलिन्द! कविता रघुनाथांची आहे, हे कळवलंस. दोघेही परभणीचे म्हणून माझा घोळ झाला का? कोण जाणे. कधीची ही कविता मनात घोळते आहे पण कातांची आहे याची खात्री वाटत नव्हती म्हणून टाकली नव्हती.
मुलगी लग्न होवून माहेरी गेल्यावर घरावर जे रितेपण येते त्यावर ही कविता आहे . त्या काळात कॅनडाच्या लाकडाच्या छोट्या बाहुल्या येत लहान मुले त्या सोबत खेळत पंढरपूरला या भेटत त्यामुळे विठोबा सारखा त्यांचा आकार आसयचा
In old times, girls were forced to marry at very young age and sent to in-laws house. This poem is about the father who is missing his beloved daughter that used to play with vithoba idol, treating vithoba as her own child. Hope this much background will help you decipher rest of the meaning from this very emotional poem.
एक मुलगी जीला लहानपणी खेळवयास पांडूरंगाची मूर्ती दिली होती. खेळताना ती त्या पांडूरंगाची आई व्हायची. ती मुलगी लग्न होऊन सासरी जाते. तेंव्हा पिता सैरभैर होऊन ही कविता लिहितो.
ह्या कवितेततू कवीने, नुकत्याच सासरी गेलेल्या मुलीच्या आठवणीने दुःखी असलेल्या वडीलांच्या भावनांना शब्दरूप दिले आहे. पुर्वी लहानपणीच मुलींची लग्न लावून द्यायची पद्धत होती. काल पर्यंत आपलं लेकरू घराच्या ओसरीत जिथे भातुकली खेळायचं, चंदनाच्या विठोबाची आई बनून जे घरकूल तीने बसवलेलं होतं, त्यात हा पिता आता ते हरवलेले की हिरावलेले क्षण शोधतोय.
मराठवाडय़ातील लातूर या गावात !! मी त्यावेळी लातूरच्या राजस्थान विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होतो. आवडीचा विषय अर्थातच इतिहास आणि मराठी!!
त्यातही मराठी जास्तच जवळची..!! कारण तो विषय शिकवणाऱ्या बाई खूपच मन लावून शिकवायच्या. त्यामुळे त्यांचा तास म्हणजे आम्हाला वैचारिक मेजवानीच असायची. केवळ पुस्तकात आहे, तितकेच न शिकवता त्याच्या अनुषंगाने इतरही बरेच काही त्या शिकवायच्या. त्यामुळे नकळत दृष्टी आणि मनदेखील व्यापक होत गेले.
आज जाहिरातीच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून वावरताना मी केलेल्या जाहिरातीमधील मराठी वाक्यरचना, त्याचे व्याकरण अतिशय नेटके व उठावदार असते, त्याचे सर्व श्रेय त्या ‘मराठी’ शिकवणाऱ्या बाईंचेच !!!
त्याकाळात त्यांनी जे मन लावून शिकवले, ते केवळ परीक्षेतील दहापाच मार्कापुरते नव्हते, तर अंत:करणापासून शिकवलेले असल्याने आमच्याही काळजात ‘मराठी’ ही संस्कृती रुजली आहे. याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच !!
तर एके दिवशी अशाच नेहमीप्रमाणे त्या तासावर आल्या. मराठवाडय़ातील परभणीचे एक महान कवी बी. रघुनाथ यांची ‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली’ ही कविता आम्हाला त्यावेळी पाठय़क्रमात होती. ती कविता बाईंनी शिकवायला सुरुवात केली. ती कवितादेखील त्या कवींच्या वैयक्तिक जीवनातील एक सत्यकथाच होती. ती त्यांनी शब्दांतून सजवली होती.
कवितेचा थोडक्यात सारांश असा होता की, कवीची मुलगी लहान असताना भातुकलीच्या खेळातील एक लाकडी विठोबाची मूर्ती नेहमी आवडीने खेळायची. त्याच्याशी लाडेलाडे बोलायची. खोटा खोटा दूधभात त्या विठोबाला ती कधी कधी खाऊ घालायची तर कधी लटके रागवायचीदेखील..!! तिच्या विश्वातला तो ‘लाकडी विठोबा’ म्हणजे सर्वस्व होते.
कालांतराने भातुकली खेळणारी कवीची ती मुलगी मोठी होते. यथावकाश परंपरेप्रमाणे तिचे लग्न होते आणि ती मुलगी सासरी निघून जाते. आणि इकडे माहेरी (म्हणजे कवीच्या घरी) एका कोनाडय़ात त्या भातुकलीचा खेळ पडून राहतो. त्यातच तिचा तो लाकडी विठोबादेखील पडून असतो. त्याच्याकडे पाहिल्यावर कवीला सासरी गेलेल्या आपल्या त्या लेकीची आठवण येते, आणि कवी गहिवरून जातो. कारण मुलगी नसल्याने ते घर, ती भातुकली एकूणच सारे काही मुके मुके झालेले असते.
तो एकलेपणाचा गहिवर शब्दात मांडताना कवी बी. रघुनाथ.. जणू बाकीच्यांना सांगत असतात की.. हा विठोबा असा का एकटा पडलाय? तर त्याची देखभाल करणारी मुलगी जणू त्याची मायच होती, तीच आता तिच्या गावाला (म्हणजे सासरी) गेली आहे.
त्या भावनेतून साकारले गेलेले ते अजरामर काव्य म्हणजेच… ‘‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली.. तिच्या मायेची ही पंढरी.. आज ओस झाली’’
ही कविता आमच्या त्या शिक्षिका बाई शिकवत असताना इतक्या तन्मयतेने शिकवत होत्या की नकळतपणे आमच्याही डोळ्यात ‘ती लेक सासरी गेल्यानंतरची वडिलांची भाव विव्हलता’ पाणी आणून गेली..!!
कविता शिकवून संपली. वर्ग संपायला अजून पाच मिनिटे शिल्लक होती. वर्गातील सर्व मुले नि:शब्द झालेली..!! आणि त्या शांततेचा भंग करीत हळुवार आवाजात त्या बाई म्हणाल्या..
*‘‘मुलांनो… ती जी सासरी गेलेली मुलगी होती ना.. ती म्हणजे मीच आहे. कवी बी. रघुनाथ हे माझे वडील.. माझे लग्न झाल्यावर वडिलांनी माझ्यावर लिहिलेली ती कविता.. होती..’’*
हे ऐकताच आमच्या अंगावर सरसरून काटा आला. किती अलौकिक भाग्याचा तो क्षण होता. आम्ही सारेच दिड्मूढ झालो. काय बोलावे काहीच सुचेना.. साक्षात जिच्यावर कविता करण्यात आलेली, तीच मुलगी मोठी झाल्यावर आम्हाला तीच कविता शिकवायला येते.. किती विलक्षण योगायोग ना..???
त्या बाईंचे नाव.. *सुधा नरवाडकर*… आता त्या निवृत्त झाल्या असून नांदेड येथे आपल्या दोन्ही डॉक्टर मुलांसह आनंदाने उर्वरित जीवन जगत आहेत..!!
*~ श्री. धनंजय देशपांडे, लातूर* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ पूर्वी लोकसत्तेत हा लेख आला होता... तेव्हा शोधून कविता वाचली होती...
चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली पंढरी या ओसरीची आज ओस झाली
कोनाड्यात उमडून पडे घरकूल आज सत्य कळो येई दाटीमुटीतील
कांही दिसे भरलेले रित्या बोळक्यात गवसले आजवर जे न रांजणात
ही कविता बहुदा कांतांची आहे,
ReplyDeleteशब्दही आठवणीत आहेत तसे लिहिले आहेत.
काही बदल असतील तर कळवा.
धन्यवाद, मिलिन्द!
ReplyDeleteकविता रघुनाथांची आहे, हे कळवलंस.
दोघेही परभणीचे म्हणून माझा घोळ झाला का? कोण जाणे.
कधीची ही कविता मनात घोळते आहे पण कातांची आहे याची
खात्री वाटत नव्हती म्हणून टाकली नव्हती.
शब्द बरोबर असावेत.
बदल असेल तर कळवा.
वाह, काय सुंदर आहे ही कविता☺️
ReplyDeleteवाह, काय सुंदर आहे ही कविता☺️
ReplyDeleteअगदी थोड्या शब्दात मोठा भावार्थ सांगणारी कविता खूप भावली.
ReplyDeleteकविता खूपच आहे सुंदर , पण जर या कवितेचा उत्तूंग असलेला भावार्थ कळला तर यातला गोडावा आणखीणच वाढेल
ReplyDeleteही कविता बी रघुनाथांची लहान कन्या सुट्टीला आजोळला गेल्यावर तिची बाहुली (आधी पंढरपूरला विठ्ठलाच्या लाकडी बाहुल्या मिळत असत) एकटी पडली त्या बद्दल आहे
Deleteमुलगी लग्न होवून माहेरी गेल्यावर घरावर जे रितेपण येते त्यावर ही कविता आहे . त्या काळात कॅनडाच्या लाकडाच्या छोट्या बाहुल्या येत लहान मुले त्या सोबत खेळत पंढरपूरला या भेटत त्यामुळे विठोबा सारखा त्यांचा आकार आसयचा
DeleteIn old times, girls were forced to marry at very young age and sent to in-laws house. This poem is about the father who is missing his beloved daughter that used to play with vithoba idol, treating vithoba as her own child. Hope this much background will help you decipher rest of the meaning from this very emotional poem.
Deleteएक मुलगी जीला लहानपणी खेळवयास पांडूरंगाची मूर्ती दिली होती. खेळताना ती त्या पांडूरंगाची आई व्हायची. ती मुलगी लग्न होऊन सासरी जाते. तेंव्हा पिता सैरभैर होऊन ही कविता लिहितो.
Deleteह्या कवितेततू कवीने, नुकत्याच सासरी गेलेल्या मुलीच्या आठवणीने दुःखी असलेल्या वडीलांच्या भावनांना शब्दरूप दिले आहे. पुर्वी लहानपणीच मुलींची लग्न लावून द्यायची पद्धत होती. काल पर्यंत आपलं लेकरू घराच्या ओसरीत जिथे भातुकली खेळायचं, चंदनाच्या विठोबाची आई बनून जे घरकूल तीने बसवलेलं होतं, त्यात हा पिता आता ते हरवलेले की हिरावलेले क्षण शोधतोय.
ReplyDeleteवा.रा. कांत हे नांदेडचे होते. बी. रघुनाथ हे परभणीचे होते
ReplyDelete🙏🏽
Delete*विलक्षण योगायोगाची*
ReplyDelete*एक भावुक सत्यकथा*
💕❣️
कथा घडली सुमारे ३५ वर्षांपूर्वी..
मराठवाडय़ातील लातूर या गावात !! मी त्यावेळी लातूरच्या राजस्थान विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होतो. आवडीचा विषय अर्थातच इतिहास आणि मराठी!!
त्यातही मराठी जास्तच जवळची..!! कारण तो विषय शिकवणाऱ्या बाई खूपच मन लावून शिकवायच्या. त्यामुळे त्यांचा तास म्हणजे आम्हाला वैचारिक मेजवानीच असायची. केवळ पुस्तकात आहे, तितकेच न शिकवता त्याच्या अनुषंगाने इतरही बरेच काही त्या शिकवायच्या. त्यामुळे नकळत दृष्टी आणि मनदेखील व्यापक होत गेले.
आज जाहिरातीच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून वावरताना मी केलेल्या जाहिरातीमधील मराठी वाक्यरचना, त्याचे व्याकरण अतिशय नेटके व उठावदार असते, त्याचे सर्व श्रेय त्या ‘मराठी’ शिकवणाऱ्या बाईंचेच !!!
त्याकाळात त्यांनी जे मन लावून शिकवले, ते केवळ परीक्षेतील दहापाच मार्कापुरते नव्हते, तर अंत:करणापासून शिकवलेले असल्याने आमच्याही काळजात ‘मराठी’ ही संस्कृती रुजली आहे. याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच !!
तर एके दिवशी अशाच नेहमीप्रमाणे त्या तासावर आल्या. मराठवाडय़ातील परभणीचे एक महान कवी बी. रघुनाथ यांची ‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली’ ही कविता आम्हाला त्यावेळी पाठय़क्रमात होती. ती कविता बाईंनी शिकवायला सुरुवात केली. ती कवितादेखील त्या कवींच्या वैयक्तिक जीवनातील एक सत्यकथाच होती. ती त्यांनी शब्दांतून सजवली होती.
कवितेचा थोडक्यात सारांश असा होता की, कवीची मुलगी लहान असताना भातुकलीच्या खेळातील एक लाकडी विठोबाची मूर्ती नेहमी आवडीने खेळायची. त्याच्याशी लाडेलाडे बोलायची. खोटा खोटा दूधभात त्या विठोबाला ती कधी कधी खाऊ घालायची तर कधी लटके रागवायचीदेखील..!! तिच्या विश्वातला तो ‘लाकडी विठोबा’ म्हणजे सर्वस्व होते.
कालांतराने भातुकली खेळणारी कवीची ती मुलगी मोठी होते. यथावकाश परंपरेप्रमाणे तिचे लग्न होते आणि ती मुलगी सासरी निघून जाते. आणि इकडे माहेरी (म्हणजे कवीच्या घरी) एका कोनाडय़ात त्या भातुकलीचा खेळ पडून राहतो. त्यातच तिचा तो लाकडी विठोबादेखील पडून असतो. त्याच्याकडे पाहिल्यावर कवीला सासरी गेलेल्या आपल्या त्या लेकीची आठवण येते, आणि कवी गहिवरून जातो. कारण मुलगी नसल्याने ते घर, ती भातुकली एकूणच सारे काही मुके मुके झालेले असते.
तो एकलेपणाचा गहिवर शब्दात मांडताना कवी बी. रघुनाथ.. जणू बाकीच्यांना सांगत असतात की.. हा विठोबा असा का एकटा पडलाय? तर त्याची देखभाल करणारी मुलगी जणू त्याची मायच होती, तीच आता तिच्या गावाला (म्हणजे सासरी) गेली आहे.
त्या भावनेतून साकारले गेलेले ते अजरामर काव्य म्हणजेच… ‘‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली.. तिच्या मायेची ही पंढरी.. आज ओस झाली’’
ही कविता आमच्या त्या शिक्षिका बाई शिकवत असताना इतक्या तन्मयतेने शिकवत होत्या की नकळतपणे आमच्याही डोळ्यात ‘ती लेक सासरी गेल्यानंतरची वडिलांची भाव विव्हलता’ पाणी आणून गेली..!!
कविता शिकवून संपली. वर्ग संपायला अजून पाच मिनिटे शिल्लक होती. वर्गातील सर्व मुले नि:शब्द झालेली..!! आणि त्या शांततेचा भंग करीत हळुवार आवाजात त्या बाई म्हणाल्या..
*‘‘मुलांनो… ती जी सासरी गेलेली मुलगी होती ना.. ती म्हणजे मीच आहे. कवी बी. रघुनाथ हे माझे वडील.. माझे लग्न झाल्यावर वडिलांनी माझ्यावर लिहिलेली ती कविता.. होती..’’*
हे ऐकताच आमच्या अंगावर सरसरून काटा आला. किती अलौकिक भाग्याचा तो क्षण होता. आम्ही सारेच दिड्मूढ झालो. काय बोलावे काहीच सुचेना.. साक्षात जिच्यावर कविता करण्यात आलेली, तीच मुलगी मोठी झाल्यावर आम्हाला तीच कविता शिकवायला येते.. किती विलक्षण योगायोग ना..???
त्या बाईंचे नाव.. *सुधा नरवाडकर*… आता त्या निवृत्त झाल्या असून नांदेड येथे आपल्या दोन्ही डॉक्टर मुलांसह आनंदाने उर्वरित जीवन जगत आहेत..!!
*~ श्री. धनंजय देशपांडे, लातूर*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
पूर्वी लोकसत्तेत हा लेख आला होता... तेव्हा शोधून कविता वाचली होती...
चंदनाच्या विठोबाची
माय गावा गेली
पंढरी या ओसरीची
आज ओस झाली
कोनाड्यात उमडून
पडे घरकूल
आज सत्य कळो येई
दाटीमुटीतील
कांही दिसे भरलेले
रित्या बोळक्यात
गवसले आजवर
जे न रांजणात
~ बी. रघुनाथ
✨✨✨