Monday, July 4, 2011

----- सौमित्र (किशोर कदम)

जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे,
जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे,
मना सारखा अर्थ लागायचे, अन मना सारखे शब्द ही यायचे.

नदी सागराचे किनारे कधी ही मुक्याने किती वेळ बोलायचे,
नदी सागराचे किनारे कधी ही मुक्याने किती वेळ बोलायचे,
निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पाहायचे.

उदासी जरासी गुलाबीच होती गुलाबातही दुख दाटायचे
उदासी जरासी गुलाबीच होती गुलाबातही दुख दाटायचे
जरा एक तारा कुठेही निखळता नभाला किती खिन्न वाटायचे

असे ही दिवसकी उन्हाच्या झळानी जुने पावसाळे नवे व्हायचे,
असे ही दिवसकी उन्हाच्या झळानी जुने पावसाळे नवे व्हायचे,
रुतून रुतुनी जरा भागले की नव्याने जुने झाड उगवायचे,

मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे,
मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे,
मना भोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे.

आता सांझ वेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊनी चालायचे,
आता सांझ वेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊनी चालायचे,
आता पावलेही दुखू लागले की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे.

जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे,
जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे.

2 comments: